Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनांसंबंधीचे ५ गैरसमज

Electric Vehicle (EV)

0

मागील काही वर्षांत देशभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicle) विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. नागरिकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासंदर्भात जागरूकता निर्माण होत असली तरी आजही काही गैरसमज त्यांच्या मनात घर करून आहेत. सदर लेखात हेच गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर पाहता सद्यस्थितीत लवकरच पर्यायी इंधनाकडे भारताला वळावे लागेल, असे मत नुकतेच केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. देशात अतिरिक्त वीजनिर्मिती होत असल्याने इलेक्ट्रिक ऊर्जेकडे वळण्याचे लक्ष्य लवकरच साध्य होऊ शकते असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हे नक्की वाचा: इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याची ५ कारणे

Electric Vehicle (EV) Myths : ईव्ही संदर्भातील ५ गैरसमज

१. ईव्ही चार्ज करण्यासाठी वेळ लागतो:

  • इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणा-या नागरिकांची सर्वात मोठी चिंता म्हणजे ईव्ही चार्ज करण्यासाठी खूप तास लागतात. परंतु एखादा उत्तम पार्किंग लॉट किंवा गॅरेज असेल तर बेसिक २४०v पॉवर आउटलेटसह, दररोज रात्री ईव्हीज चार्ज केल्या जाऊ शकतात. त्यामुळे पेट्रोल पंप किंवा सीएनजी स्टेशनवरील लांब रांगा टाळता येतील.
  • एकदा भारतीय महामार्गांवर चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर विकसित झाल्यावर गाडी चालवणे अधिक सुलभ होईल.
  • सध्याचे सुपरचार्जर ३० ते ६० मिनिटात पूर्ण चार्ज करून देतात. लांबच्या प्रवासात एखाद्या ठिकाणी थांबून ब्रेकफास्ट किंवा जेवण करायला साधारण एवढा वेळ लागतोच.
  • अनेक कंपन्या त्यांच्या पार्किंगच्या जागेतच चार्जिंग स्टेशन बनवण्याबाबत विचार करीत आहेत. ईव्हीसाठी पुरेशा पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा त्यांचा सर्वोतपरी प्रयत्न चालू आहे.

२. ईव्ही किफायतशीर नसतात:

  • आजच्या लक्झरी बाजारात बहुतांश ईव्ही उच्च किंमतीला उपलब्ध आहेत. मात्र या स्थितीत वेगाने बदल होत आहे.
  • भारतात सबसिडीमुले किंमती कमी केल्या जात आहेत व सर्वसामान्य ग्राहकांनाही खरेदी करणं शक्य होईल यासाठी प्रयत्न चालू आहेत.
  • सामान्य वाहनांच्या तुलनेत यामध्ये पार्ट्स कमी असल्याने व यामध्ये ऑइलदेखील वापरले जात नसल्याने त्यांची देखभालही स्वस्त असेल.
  • विविध कारनिर्मात्या कंपन्या निश्चित पुनर्विक्री मूल्य सुविधादेखील प्रदान करीत असून एमजी मोटर्सने झेडएस ईव्हीकरिता cardekho.com सोबत भागीदारी केली आहे.
  • cardekho.com झेडएस ईव्हीला खरेदी करून तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांना ५०% च्या अवशिष्ट किंमतीवर बायबॅकची हमी देत आहे.

३. ईव्ही बॅटरी महाग असतात व वारंवार बदलण्याची गरज असते:

  • लिथियम-आयन बॅटरींची किंमत भरपूर कमी होत आहे. उच्च कार्यक्षमतेच्या बॅटरीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यावर भारत भर देणार आहे.
  • सध्याच्या ईव्ही बॅटरी २४१,००० किमी नंतर ९०% क्षमता दर्शवतात. सामान्य भारतीय चालक उपरोक्त अंतरही पार करत नाहीत.
  • जे हे अंतर पूर्ण करतात त्यांना ईव्ही कंपन्या ८ वर्षांच्या बॅटरीची गॅरेंटी देतात. जसे की एमजी झेड एस ईव्ही ८ वर्ष/ १,५०,००० किमीची वॉरंटी देते.

महत्वाचा लेख: बनावट वाहनविमा योजनेपासून सावध रहा

४. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी ईव्ही उपयुक्त नाहीत:

  • ईव्ही स्वीकारण्याचे प्रमाण कमी असण्यामागील आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे हे वाहन लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी योग्य नाही, अशी समजूत. मात्र नव्या काळातील जागतिक स्तरावरील इलेक्ट्रिकल वाहनांमध्ये अत्यंत कार्यक्षम बॅटरीज असून त्या ३०० किलोमीटर अंतरावरील प्रवासाची हमी देतात.
  • येणाऱ्या कालावधीत ईव्ही बाजारात जागतिक स्तरावरील लीडर्सचा प्रवेश अपेक्षित असून सध्याच्या बाजाराला गती मिळण्याची अपेक्षा आहे. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध झालेल्या ईव्हीजचे ते स्थानिकीकरण करतात. त्यामुळे भारतातील स्थानिक ग्राहकांच्या मागण्या त्याद्वारे अधिक चांगल्या पद्धतीने पुरवल्या जाऊ शकतात.
  • चार्जिंग स्टेशनवर सरकारचा भर वाढत आहे ज्यामुळे दूरचा पल्ला गाठणे सहज शक्य होईल.

५. ईव्हीचा वेग कमी असतो:

  • याआधीही बहुतांश इलेक्ट्रिक वाहनांबाबतची ही सामान्य धारणा होती. पण इलेक्ट्रिक कारचीही स्पर्धा असते हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल.
  • ईव्ही संपूर्ण टॉर्कचे रुपांतर करू शकतात, ज्यामुळे द्रुतगती महामार्गावर प्रवास करण्यासाठी त्या उपयुक्त ठरतात.
  • वाहनांमध्येही ईव्हीज २.५ सेकंदात ०-९६ किमी प्रति तास वेग धारण करू शकतात. उदा. एमजी झेडएस ईव्ही ०-१०० किमी/प्रति तास केवळ ८.५ सेकंदात कव्हर करू शकते.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.