पंडित जवाहरलाल नेहरू भाषण मराठी | Pandit jawaharlal nehru information in marathi
पंडित जवाहरलाल नेहरू माहिती व भाषण मराठी| Pandit jawaharlal nehru bhashan marathi.
पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध भाषण (Essay/Nibandh on pandit Nehru in Marathi) (३०० शब्द)
अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ती तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी उत्तर प्रदेश मधील अलाहाबाद शहरात झाला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू नामांकित वकील होते. पंडित नेहरूंना लहान मुले खूप आवडत असत. यामुळेच त्यांना चाचा नेहरू म्हणून देखील संबोधले जाऊ लागले. प्रत्येक वर्षी त्यांच्या जन्म दिवसाला ‘बाल दिन’ म्हणून साजरा होतो.
पंडित नेहरू 15 वर्षाचे असतात त्याच्या वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी इंग्लंड च्या हैरो स्कूल मध्ये पाठून दिले. या नंतर केब्रिज विश्वविद्यालयातुन त्यांनी पुढील उच्च शिक्षण मिळवले. 1912 साली पंडित नेहरू आपले ग्रॅज्युएशन पूर्ण करून भारतात परत आले.
भारतात परत आल्यावर ते भारतीय स्वतंत्र लढ्यात सामील झाले. या दरम्यान त्यांची गांधीजीशी चांगली ओळख झाली. गांधीजी द्वारे प्रभावित होऊन ते 1919 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये सामील झाले. 1920 ते 1930 दरम्यान इंग्रजांनी पंडित नेहरूंना बऱ्याचदा तुरुंगात टाकले. 1928 साली काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात त्यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. याच अधिवेशनात ‘पूर्ण स्वराज्य’ ची मांग करण्यात आली. 26 जानेवारी 1930 ला पंडित नेहरूंनी लाहोर मध्ये स्वतंत्र भारताचा झेंडा फडकवला. 1942 मध्ये जेव्हा गांधीजींनी भारत छोडो आंदोलनाची सुरुवात केली, तेव्हा या आंदोलनात पंडित नेहरूंनी पुढाकार घेतला. इंग्रजांनी पंडित नेहरू समेत गांधीजी व अन्य काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना बंदी बनवले आणि तीन वर्षानंतर म्हणजेच 1945 मध्ये मुक्त केले. 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या स्वातंत्र्यसाठी त्यांनी इंग्रज सरकार सोबत महत्त्वाची चर्चा केली.
1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधीजींनी पंडित जवहरलाल नेहरू यांना स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून निवडून दिले. भारतातील सर्व संस्थानांना एकत्रित करण्याचे काम पंडित नेहरू यांनी केले. त्यांनी एकाच झेंड्याखाली सर्व स्वतंत्र रियासतांना आणले. पंडित नेहरूंनी भारताच्या पुननिर्माण कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी 50 व्या दशकात खूप सारे राजनेतिक, आर्थिक आणि सामाजिक निर्णय घेतले. 27 मे 1964 ला सकाळच्या वेळी अचानक त्यांची तब्येत बिघडली व दुपारी 2 वाजेच्या सुमारास हृदय विकाराने त्यांचे निधन झाले.