‘कंट्री ऑफ स्वीट्स’ ! या आहेत भारतीय मिठाया ज्यांनी जगात देशाला मिळवून दिली ओळख

0

गोड आणि मिष्ठान्न खायला कुणाला नाही आवडणार. मिष्ठान्न तर भगवान श्रीकृष्णाचे आवडते खाद्य होते. भारतामधील अनेक प्रांत मिष्ठानांकरता प्रसिद्ध आहेत. मुळात भारत देश हा ‘कंट्री ऑफ स्वीट्स’ म्हणून जगतभरात ओळखला जातो. भारत हा देश विविधतेने नटलेला असल्यामुळे या देशात प्रत्येक जातीचे प्रत्येक प्रांताचे स्वतःचे एक वेगळे मिष्ठान प्रसिद्ध आहे. भारतामध्ये गोड खाण्याला पण वेगळे महत्त्व दिले आहे.

जर कुणी परीक्षा द्यायला किंवा एखादे चांगले काम करायला जात असेल तर त्याला ‘दही साखर’ खायला लावतात, भारतात हे करणे शुभ मानले जाते. जर कुणी परीक्षेत किंवा आपल्या कामात उत्तीर्ण झाला तर मिठाई देऊन ही बातमी दिली जाते. एखादी आनंदाची बातमी मिळाल्यावर मिठाई वाटली जाते. भारतामध्ये घरात एखादी मोठी नवीन वस्तू जरी घेतली तरी आधी पूजा करून मग ती वस्तू वापरतात आणि त्यासोबत मिठाई किंवा गोडधोड करणे तर आलेच. अर्थातच भारतातील प्रत्येक महत्त्वाच्या कामात किंवा बातमीमध्ये गोड खाणे, मिष्ठान खाऊन तोंड गोड करणे यालासुद्धा खूप महत्त्व दिले आहे.

चला तर जाणून घेऊयात ‘ मिष्ठानांचा देश’ भारत देशात कोणते मिष्ठान्न सर्वात जास्त लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहेत…

१. गुलाब जामून.

गुलाबजाम हा भारतीय उपखंडात प्रचलित असणारा एक लोकप्रिय मिष्ठान आहे.खव्यात काही प्रमाणात मैदा मिसळून गोळे तयार केले जातात. हे गोळे तेलात तळून नंतर साखरेच्या पाकात बुडवून ठेवले जातात. काही वेळा या साखरेच्या पाकात वेलदोडा, गुलाबजल, केशर, केवडा यांचा स्वाद दिला जातो. साखरेच्या पाकातल्या गुलाबजांबांप्रमाणेच साखरेत घोळवलेले सुके गुलाबजांबदेखील काही ठिकाणी बनवले जातात. भारताखेरीज तुर्कस्तानमध्ये ‘केमाल पाशा मिठाई’ या नावाचा गुलाबजांमसारखा मिष्ठान बनवला जातो. काही ठिकाणी रव्याचे गुलाबजाम ही बनवतात.

Gulabjam

२. गाजराचा हलवा.

मूळ गाजराचा हलवा हा पहिल्यांदा मुघल काळात सुरु झाला होता आणि याचे नाव अरबी शब्द “हलवा” पासून उद्भवले आहे, ज्याचा अर्थ “गोड” असा आहे आणि तो गाजरापासून बनविला गेला आहे त्यामुळे तो ‘गाजरचा हलवा’ म्हणून ओळखला जातो. हे पंजाबी हलव्याच्या इतर प्रकारांसारखेच आहे. पारंपारिकपणे गाजराचा हलवा हे मिष्टान्न म्हणून दिवाळी, होळी, ईद अल-फितर आणि रक्षाबंधन या निमित्ताने भारतात सर्व सण-उत्सवाच्या वेळी बनवला आणि खाल्ला जातो. साधारणपणे हिवाळ्यामध्ये हे मिष्टान्न गरम गरमच खाल्ले जाते. गाजराचा हलवा हा इतर गोड पदार्थांसारखा जास्त काळ चांगला राहू शकत नाही त्यामुळे हा कमी प्रमाणात तयार केला जातो.

Gajrcha Halwa

३. संदेश

संदेश हे एक बंगाली मिष्टान्न आहे, हे मिष्ठान्न दूध आणि साखरेसह बनवले जाते . संदेशाच्या काही पाककृतींमध्ये दूध न घेता छेना किंवा पनीर देखील वापरतात. हे मिष्ठान्न मऊ असते आणि तोंडात गेल्याबरोबर विरघळते.

Sandesh

४. मोदक

मोदक हे महाराष्ट्रात व दक्षिण भारतात प्रचलित असलेले एक मिष्ठान्न आहे. महाराष्ट्रामधे विशेष पूजाप्रसंगी गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. उकडीच्या आणि तळणीच्या मोदकांखेरीज खवा, सुकामेवा, चॉकलेट, असे विविध फ्लेवरचे मोदक बनवले जातात. फ्लेवर्सचे मोदक आता विशेष लोकप्रिय आहेत. गणेशाला मोदक खूप आवडत होते, असे म्हणतात. म्हणून गणेश चतुर्थीला मोदकांचा नैवद्य दाखवतात.

ukdiche modak

५.पायसम

खीर किंवा पायसम हा भारतीय उपखंडातील सांजाचा एक प्रकार आहे , ज्यामध्ये खालीलपैकी एका पदार्थाबरोबर दूध आणि साखर उकळवून बनवले जाते :
तांदूळ , गहू , बाजरी , टॅपिओका , व्हर्मीसेली किंवा गोड कॉर्न .
यात वरून नारळाचा किस , वेलची , मनुका , केशर , काजू , पिस्ता , बदाम किंवा इतर ड्राय फ्रुट्स टाकले जातात. हे सहसा जेवताना किंवा मिष्टान्न म्हणून दिले जाते .

kheer

६. काजू कतली

काजू कतली हे लहान मुलांच्या जास्त आवडीचे मिष्ठान आहे. ज्यांना गोड खायला आवडत नाही ते काजू कतलीची चव घेतात. कारण याची चव जास्त गोड नसते. पण हे खायला खूप चवीचे असते. कुणाला भेट म्हणून न्यायचे असले, तर काजू कतली एक उत्तम पर्याय आहे.

kaju katli

७. कुल्फी

कुल्फी सहसा “पारंपारिक भारतीय आईस्क्रीम ” म्हणून ओळखली जाते . ही भारत , श्रीलंका , पाकिस्तान , बांगलादेश , नेपाळ , बर्मा (म्यानमार) आणि मध्य पूर्व येथे लोकप्रिय आहे. भारतीय रेस्टॉरंट्समध्ये हे सर्वत्र उपलब्ध असते. उन्हाळ्यात तर ‘कुल्फी वाले भैया’ घराघरात छोट्या मुलांसाठी कुल्फी घेऊन येतात.

kulfi

८. पूरण पोळी

पूरण पोळी हे गणेश चतुर्थीसारख्या विविध उत्सवांच्या निमित्ताने बनविले जाणारे महाराष्ट्रीयन मिष्टान्न आहे. पूरण पोळी ही चना डाळ आणि साखरेची स्टफिंग असलेली पोळी असते. मराठी भाषेत, स्टफिंग भरण्याला पूरण म्हणतात आणि बाहेरील भाकरीला पोळी म्हणतात.

Puran poli

९.अप्पम

अप्पम हे पॅनकेकचे एक प्रकार आहे, हे एक मिष्ठान्न आहे. या मिष्ठानाचे उत्पन्न दक्षिण भारत मध्ये झाले. केरळ , श्रीलंका , तामिळनाडू इ. बऱ्याच ठिकाणी हे नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणासाठी बर्‍याचदा खाल्ले जाते.

Appam

१०. घेवर

घेवर एक राजस्थानी मिष्ठान्न आहे. राजस्थान व्यतिरिक्त हे हरियाणा , दिल्ली , गुजरात , पश्चिम उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश इत्यादी ठिकाणांमध्ये देखिल प्रसिद्ध आहे .हे मैदासह साखरेच्या पाकात भिजवून बनविलेले डिस्क आकाराचे एक गोड केक आहे. घेवराचे अनेक प्रकार आहेत, त्यात साधा, मावा आणि मलाई घेवार यांचा समावेश आहे. हे मिष्ठान्न साधारणत: जुलै ते ऑगस्टमध्ये तीज किंवा रक्षाबंधन उत्सवासाठी बनवतात.

ghevar

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.