काही संकेतांनी समजा प्रेम होतं आहे कमी, इमोशन्सने होणार तुमचे नाते मजबूत
कोणतेही नाते प्रेम आणि विश्वास यावर टिकून राहते. परंतु जेव्हा दोघेजण बराच काळ एकत्र राहतात तेव्हा त्यांचे विचार, सवयी इत्यादीमुळे एकमेकांमध्ये छोटेसे विवाद होणे सामान्य आहे. यामुळे नात्यात अडचण निर्माण होते आणि प्रेम संपू लागते. अशा परिस्थितीत नाते एक ओझे असल्यासारखे वाटतात. जर नात्यात येणारे अंतर योग्य वेळी ओळखले गेले तर सुखी आयुष्य जगणं सुलभ होतं.
गैरसमज निर्माण होऊ देऊ नका, जोडीदाराची नेहमी काळजी घ्या
गैरसमज होण्यापासून थांबवा वेळीच सावध होऊन लगेच गैरसमज दूर करा. अबोला धरू नका, बोलण्याने प्रश्न सुटतात. कधी कधी तुमच्या जोडीदाराचा व्यवहार तुमच्याशी नीट नसते. तुम्ही आजारी असाल तर कदाचित ते तुमच्या मनासारखी तुमची काळजी करणार नाही. असे नेहमी असेल तर तुमच्यात प्रेम संपत आहे. नाते योग्य ठेवण्यासाठी जोडीदारासमोर तुमच्या भावना व्यक्त करा. त्यांची काळजी करा. कारण कोणतेही नाते प्रेम आणि अटेंशन मिळावे अशीच अपेक्षा करतो.
इमोशन्स आहेत महत्त्वाचे
नेहमी प्रॅक्टिकली विचार करण्याची गरज नाही. नात्यातील बोलणे कधीच प्रॅक्टिकली असू नये. इमोशन्सने दुरावेलेले नाते जवळ आणता येतात. एकेमेकांविषयी भावनात्मक बाजू तेव्हा संपते, जेव्हा त्यांच्यातील प्रेम संपण्याच्या मार्गावर येतो.
प्रेम व्यक्त करायला विसरू नका
असे घडते की सुरुवातीस, जोडपे आपले प्रेम व्यक्त करतात, परंतु ते जबाबदाऱ्याखाली प्रेम व्यक्त करणे विसरूनच जातात. अशा परिस्थितीत, त्यांच्यातील प्रेम संपत जाते. आपले प्रेम फुलायला हवे असेल तर आपण आपले प्रेम व्यक्त केले पाहिजे. प्रेम व्यक्त करण्याचे बरेच मार्ग असू शकतात जसे की, ‘आय लव्ह यु’ म्हणणे, त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेऊन त्यांच्याबद्दल मनात किती काळजी आहे, हे सांगणे. अशा रीतीने तुमचे प्रेम कायम राहील.
हे पण वाचा
अगदी सोप्या पद्धतीने बनवा मुळ्याचे पराठे, खायला चविष्ट आणि आरोग्यासाठी पौष्टिक…
आज्जीचा बटवा : पानपुड्याची शोभा वाढवणारा ‘ओवा’ आहे आरोग्यदायी, जाणून घ्या फायदे…
छोट्या व्यावसायिकांना दिलासा म्हणून आयकर विभागाने आणली टॅक्स स्कीम, माहिती नसेल तर त्वरित जाणून घ्या